लोक नेहमी त्याला नावावरून चिडवायचे, UPSC मध्ये चौथा क्रमांक मिळवून त्याने त्याच्या नावानेच स्वतःची ओळख निर्माण केली
केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) चा निकाल जाहीर होताच देशभरातून अनेक प्रेरणादायी कथा समोर येत आहे. यूपीएससीमध्ये चौथा क्रमांक मिळवणाऱ्या ऐश्वर्य वर्माची कहाणीही अशीच काहीशी रंजक आहे. UPSC सारखी खडतर परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या नावाची खिल्ली उडवणाऱ्यांच्या तोंडावर त्याने मोठी चपराक मारली आहे.
UPSC मध्ये चौथ्या क्रमांकावर आलेला ऐश्वर्य म्हणाला की, “लोक नेहमी त्याच्या नावाची खिल्ली उडवायचे, चिडवायचे. माझे नाव ऐश्वर्या नाही तर ऐश्वर्य आहे हे मी नेहमी सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला. मला वाटले की माझे नाव मोठे झाल्यावर एक दिवस मी टीव्हीवर येईन आणि लोकांना सांगेन की माझे नाव ऐश्वर्य आहे, ऐश्वर्या नाही. शेवटी ज्याचा त्याने विचार केला होता तसेच झाले.
ऐश्वर्यने सांगितले की, त्याने यूपीएससीच्या अभ्यासासाठी 16-18 तास दिले नाहीत, पण अभ्यासासोबतच त्याने क्रिकेट आणि बुद्धिबळही खेळले. तो म्हणाला की, यूपीएससीमध्ये 16-16 तास अभ्यास करण्याची चर्चा योग्य नाही.
होय, त्याचा अभ्यासक्रम अधिक आहे, अशा परिस्थितीत, अल्प, मध्यावधी आणि दीर्घकालीन योजना बनवून संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाऊ शकतो. मला बुद्धिबळ आणि क्रिकेटची खूप आवड आहे, त्यामुळे हे खेळ खेळत मी UPSC ची तयारीही केली.
असे केल्याने अनावश्यक दबाव कमी होतो. ऐश्वर्यने सांगितले की, एखाद्याने त्याच्या पूर्ण क्षमतेने अभ्यास केला पाहिजे. कठोर परिश्रम करा आणि परिणामाची काळजी करू नका. ऐश्वर्यचे वडील बँक ऑफ बडोदामध्ये काम करतात तर आई गृहिणी आहे. ऐश्वर्यने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या कुटुंबाला दिले आहे.