गरिबीमुळे शाळा सोडावी लागली, एकेकाळी वेटर म्हणून काम केले, मेहनत करून भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी बनला..
कधी कधी काही लोकांचे यश आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असेच एक व्यक्ती म्हणजे अन्सार अहमद शेख. महाराष्ट्र राज्यातील एका जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेल्या या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली आणि तेही वयाच्या 21 व्या वर्षी. पण एक काळ असा होता की अन्सार यांच्याकडे जेवणासाठी देखील पैसे नव्हते.
महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहणाऱ्या अन्सार अहमद शेख यांनी वयाच्या 21 व्या वर्षी देशातील प्रतिष्ठित यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि 371 वा क्रमांक मिळविला. समर्पण आणि मेहनतीने त्यांना हे यश मिळाले आहे.
अहमद यांचा जन्म मराठवाडामधील जालना जिल्ह्यातील शेलगाम येथे झाला. त्यांचे वडील ऑटोरिक्षा चालवून दिवसाला जेमतेम 100 ते 50 रुपये कमवायचे. त्यांची आई शेतात काम करत असे. घरी कधी कधी अन्नाचा तुटवडा असायचा. त्यांच्या गावात शिक्षणाचा अभाव असल्याने अनेक लोक वा’ई’ट मार्गाला लागले होते. त्यांचे वडील देखील रात्री दा’रू’च्या न’शे’त यायचे आणि आईशी भांडायचे.
त्यांच्या दोन बहिणींचे लहान वयातच लग्न झाले होते. तर त्यांच्या धाकट्या भावाला आर्थिक अडचणींमुळे सहावीपर्यंत शिकवावे लागले. पण त्यांना अभ्यासाची आवड होती. पण जेव्हा ते चौथीत होते, तेव्हा त्यांच्या वडिलांची आणि कुटुंबाची इच्छा होती की त्यांनी अभ्यास थांबवावा. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षकाला भेट दिली आणि सांगितले की, मला माझ्या मुलाचे शिक्षण थांबवायचे आहे.
तेव्हा शिक्षक म्हणाले की, “अहमद खूप हुशार आहे. त्याच्या शिक्षणावर खर्च करा. तो तुमचे जीवन बदलेल.” त्यानंतर वडिलांनी अभ्यासाबद्दल काहीही सांगितले नाही. 12वीची परीक्षा पूर्ण केल्यानंतर, अहमद यांनी घरी आर्थिक दिलासा मिळावा म्हणून सकाळी 8 ते 11 या वेळेत हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले.
पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला गेले आणि तिकडे त्यांचे वडील त्यांच्या मिळकतीतील काही भाग पाठवायचे. पहिल्या वर्षी प्राध्यापकांनी अहमद यांना यूपीएससी परीक्षेबद्दल सांगितले. त्यानंतर अहमद यांनी कॉलेज तसेच यूपीएससी कोचिंगचा विचार केला. पण कोचिंग क्लासची फी भरणे अहमद यांना खूप अवघड होते. त्यावेळी अहमद यांची कोचिंग क्लासची निम्मी फी माफ केली.
IAS अन्सार म्हणाले, “मी 2015 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झालो. ज्यामध्ये माझा 371 वा क्रमांक आला.” अन्सार सध्या पश्चिम बंगाल सरकारमध्ये ओएसडी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.