या तरुणाच्या आहेत 4 राज्यांमध्ये 6 बायका! जिथे जाईल तिथे करायचा लग्न, अखेर असे पडले पितळ उघडे..
हिंदूधर्मातील विवाह कायद्यानुसार व्यक्तिला एकच लग्न करण्याचा अधिकार आहे. परंतु, आपल्याला अनेकदा पुरुष आणि महिला अनेक विवाह करताना पाहायला मिळत असतात. अशीच एक धक्कादायक घटना जमुईमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जावातारी येथे राहणारा छोटू याची पत्नी मंजू हीचा भाऊ विकास हा कोलकाता येथे जाण्यासाठी जमुई येथील स्टेशन वर गेला होता. तेव्हा त्याने आपल्या बहिणीचा पती छोटू ह्याला पाहिले. तो अन्य एका महिलेसोबत ट्रेनची वाट पाहत होता. तेव्हा विकासने त्याला रंगेहात पकडले आणि याची माहिती त्याने त्याच्या कुटुंबीयांना दिली.
यांनतर मंजूच्या कुटुंबियांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. तेव्हा जे सत्य समजले ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. छोटूने आतापर्यंत सहा लग्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी याचा अधिक तपास केला असता छोटूच्या चार राज्यांमध्ये सहा पत्नी आहेत.
त्याने लग्न केलेल्या त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला चार मुलं आहेत. त्यांनतर लग्न केलेल्या एका महिलेपासून त्याला दोन मुलं आहेत. आताही विकास ने छोटूला ज्या महिलेसोबत पकडले त्या महिलेची चौकशी केली असता तिने देखील छोटूची पत्नी असल्याचे सांगितले आहे.
मंजूचा 2018 मध्ये छोटूशी विवाह झाला होता असे तिच्या आईने पोलिसांना सांगितले. या दोघांना दोन मुलं देखील आहेत असेही सांगितले. मात्र, अचानक दीड वर्षांपूर्वी छोटू औषध आणण्यासाठी सायकल घेऊन बाहेर गेला होता तो परत आलाच नाही, अशी महिती मंजुच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे.
छोटू हा देवघर येथील मां शारदा आर्केस्ट्रामध्ये काम करत असून त्याने चिनवेरिया, रांची, देवघर, सुंदरटांड, संग्रामपूर आणि दिल्ली येथे राहणाऱ्या सहा महिलांशी लग्न केले आहे आणि या महिलांपासून त्यांना मुलं देखील आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, छोटू जिथे आर्केस्ट्रा असेल तिथे जायचा तेव्हा तो तिथे लग्न करायचा.
हा सगळा प्रकार ऐकून मंजुला तसेच तिच्या कुटुंबियांना आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलेला देखील मोठा धक्का बसला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर छोटूला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेची सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तुफान चर्चा रंगली आहे.