मन सुन्न करणारी घटना! सांगलीत आईसह तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 3 मुलींचा दु’र्दैवी अं’त..
काळ कधी सांगून येत नाही आणि काळावर नियंत्रण देखील मिळवता येते नाही. कधी काय होईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील बिळुर गावात राहणाऱ्या सुनीता माळी या रविवारी आपल्या 3 मुली अमृता, ऐश्वर्या आणि अश्विनी यांच्यासोबत गावाजवळील तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
मात्र, त्या गेल्या ते काही माघारी परतल्याच नाहीत. घरी परतल्या नसल्यामुळे शोधाशोध सुरू केली असता रविवारी सायंकाळी या चौघींचे हे मृ’त’दे’ह तलावाच्या पाण्यात आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरित पोलीसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी या चौघींचेही मृ’त’दे’ह तलावाच्या पाण्यातून बाहेर काढून जत येथील ग्रामीण रुग्णालयात श’व’वि’च्छे’द’ना’साठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. हा अ’प’घा’त आहे की नक्की घा’त’पा’त हे अजून समोर आलेले नाही.
या चौघींचा मृ’त्यू नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दु’र्दै’वी घटनेनंतर गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.