दुसरी देखील मुलगीच झाल्यामुळे पतीने पत्नीला विहिरीत ढ’कलून तिचे आयुष्य सं’पवले..
आता काही दिवसातच नवरात्र उत्सव येत आहे. अशावेळी सर्वजण देवीच्या भक्तीत दंग असतात, तिची मनोभावे पूजा करतात. देवी देखील एक स्त्री रूपच आहे मग मुलगी झाल्यावर माणसं दुःखी का होतात. आजही समाजात काही ठिकाणी मुलीच्या जन्मावर आक्षेप घेतला जातो. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर जवळ असलेल्या कापूसखेड गावात राहणारे कौस्तुभ आणि राजनंदिनी सरनोबत या दाम्पत्याला एक सात वर्षांची मुलगी आहे. त्यांनतर आता चार महिन्यांपूर्वी राजनंदिनी यांना दुसरे अपत्य म्हणून मुलगीच झाली.
एके दिवशी हे दाम्पत्य कापूसखेड परिसरात मॉर्निंग वॉक साठी गेले होते. यावेळी परिस्थितीचा फायदा घेऊन कौस्तुभ यांनी राजनंदिनी यांना विहिरीमध्ये ढ’क’लू’न दिल्याची त’क्रा’र राजनंदिनी यांच्या भावाने इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
परंतु कौस्तुभ यांनी सांगितले की, राजनंदिनी ल’घु’शं’के’साठी विहिरीजवळ गेली असता तिचा पाय घसरून ती विहरीत पडली. परंतु राजनंदिनी यांच्या आईवडिलांचे आणि भावाचे असे म्हणणे की त्यांना दुसरी मुलगीच झाल्यामुळे कौस्तुभ यांनी राजनंदिनी यांची ह’त्या केली आहे.
राजनंदिनी यांच्या कुटंबीयांनी केलेल्या त’क्रा’री’नंतर संबंधीत घटनेसाठी पोलिसांनी कौस्तुभ यांना अ’ट’क करून याबाबत अजून तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.