इंजिनिअरिंग करत असलेल्या विद्यार्थिनीने वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून सं’पवले आयुष्य..

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील रहिवाशी असलेली गीता कदम ही नांदेडमध्ये श्री गोबिंदसिंघजी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये बी. ई. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. ती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. गीता दोन दिवसांपासून कॉलेजला येत नसल्यामुळे तिची चौकशी केली असता कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये तिचा मृ’त’दे’ह आढळून आला आहे.

या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना ही बातमी समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. गीताने रात्री 11 च्या सुमारास बंद खोलीत आपले आयुष्य सं’पवले आहे, असे पोलिस तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे. घटनास्थळावरून पोलिसांना गीताने लिहिलेली एक चिठ्ठी देखील सापडली आहे.

गीताने तिच्या बरोबर शिकत असलेल्या वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून हे चुकीचे पाऊल उचलले आहे. तसेच तिने महिला आयोगाच्या नावाने ही चिठ्ठी लिहली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गु’न्हा दाखल केला आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page