महाराष्ट्रातील ‘या’ गावातील जावयांनी सासुरवाडीला जाणे केले बंद, कारण जाणुन तुम्ही देखील थक्क व्हाल..
आजही काही ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था कायम असलेली पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकांना आपला जीव देखील ग’म’वा’वा लागला आहे. तरीही रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही असे चित्र समोर येत असते. अशा परिस्थितीत अहमदनगर मधील एका गावातून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील चांदेकसारे शिवारात आहेर वस्ती आणि नन्नवरे वस्ती आहे. या ठिकाणी रस्त्यांची गेल्या 15 वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे आणि अद्याप येथे दुरुस्ती झालेली नाही. या रस्त्यांवरुन रुग्णांना रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जाणे देखील कठीण झाले आहे. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील रोज याचा त्रास सहन करावा लागत आहे.
यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीचा नि’षे’ध नोंदवला आहे. “रस्त्यांच्या अशा वाईट परिस्थितीमुळे माझे पाचही जावयी घरी येत नाहीत”, अशी संतप्त प्रतिक्रिया या गावातील महिला ग्रामस्थ सुमन गुडघे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर केले जावे अशी मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निवडणुकीत आहेर वस्ती आणि नन्नवरे वस्ती येथील ग्रामस्थांना रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिली जातात. परंतु, गेले तीन पंचवार्षिक पासून रस्त्यांची अवस्था काही बदली नाही. त्यामुळे यावेळी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीवर ब’हि’ष्का’र टाकण्याचा इशारा या संतत्प ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या या घटनेची सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तुफान चर्चा सुरू आहे.