लग्नाच्या दोन वर्षातच पत्नीचे केस झाले पांढरे, पतीने केले असे काही की..
पती-पत्नीमध्ये नेहमीच लहान सहान गोष्टींवरून खटके उडत असतात. पती-पत्नीमधील भांडणाचे अनेक किस्से आपण पाहिले आहेत. नुकताच एक अनोखा किस्सा सारन येथून समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार मधील सारन जिल्ह्यातील साहजितपूर मधील बबीता देवी आणि बनियापूर मधील पंकज साह या दोघांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. परंतु, लग्नानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये सतत भांडणे होऊ लागली. मात्र, घरच्यांनी मध्यस्थी करून त्यांची भांडणं मिटवली.
पुढे लग्नाच्या दोन वर्षानंतर बबीताचे केस पांढरे होऊ लागले. पत्नीचे पांढरे केस पाहून पंकज सतत बबिताला टोमणे मारू लागला. तिला सारखा हिनवू लागला, त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होऊ लागले. यामुळे बबिताला खूप मानसिक त्रास होऊ लागला. पतीकडून सतत होणाऱ्या त्रासाविरोधात अखेर बबीताने पोलिसात त’क्रा’र दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पंकजला चांगली समज देखील दिली होती.
मात्र, पंकजने पुढे नवीनच नाटक सुरू केले. त्याने काही दिवसांनी दुसऱ्या विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो रविवारी सायंकाळी तेथील एका मंदिरात कोणालाही न माहीत होता दुसरा विवाह करत होता.
मात्र तेथील स्थानिक लोकांनी ते पाहिले आणि त्याची माहिती त्यांनी बबीताला दिली. ही माहिती समजताच बबीता आपल्या वडिलांसह तेथे पोहचली आणि त्यांचा विवाह रोखला. त्यानंतर मंदिरात एकच गोंधळ उडाला आणि या गोंधळात पंकज तेथून पळून गेला.
या प्रकरणानंतर दोन्ही कुटुंबात खूप वाद झाला. बबिताने या संबंधित पोलिस ठाण्यात त’क्रा’र नोंदवली आहे. यामध्ये तिने सासरच्यांवर देखील ग’र्भ’पा’त करण्याचा प्रयत्न केल्याचा आ’रो’प केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तुफान चर्चा सुरू आहे.