“पांडुरंग तू मला आवडत नाहीस” असे सतत सांगून शीतल भांडणं करत असे.. काही दिवसांतच पत्नीने पतीला
लग्न हे पती-पत्नींमधले एक पवित्र बंधन असते. परंतु, ह्याच बंधनाला का’ळी’मा फासणारी एक घटना बीड येथून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड मधील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावातील 22 वर्षीय पांडुरंग राजाभाऊ चव्हाण या तरुणाचे शीतल या तरुणीसोबत 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे विवाह संपन्न झाला.
यानंतर काही दिवसांतच शीतल आणि पांडुरंग यांच्यामध्ये भांडण होऊ लागले. “पांडुरंग तू मला आवडत नाहीस” असे सतत सांगून शीतल भांडणं करत असे. यादरम्यान एके दिवशी रात्री अकरा-साडे अकराच्या सुमारास हे दाम्पत्य आपल्या खोलीत झोपले होते. त्यांनतर अचानक रात्री साडेअकराच्या दरम्यान शीतल आपल्या खोलीतून बाहेर येऊन सासू-सासर्यांना सांगू लागली की, पांडुरंग हे कोणतीच हालचाल करत नाही आहेत.
शितलचे हे बोलणे ऐकून पांडुरंगच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला त्यांनी त्वरित खोलीत जाऊन पाहिले त्याची काहीच हालचाल होत नाही हे पाहून नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, दु’र्दै’वा’ने पांडुरंगचा मृ’त्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्व चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेनंतर पांडूरंगच्या आईवडिलांनी शीतलनेच पांडुरंगाला सं’प’व’ले आहे, असा संशय व्यक्त केला. त्यांनी तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात त’क्रा’र नोंदवली. त्यांनतर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि सहा दिवसांनी शीतलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शीतलने आपला पती पांडुरंग याचा ग’ळा दा’बू’न त्याला मा’र’ल्या’चे पोलिस तपासात समोर आले आहे. यानंतर शीतल विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर परीसरात एकच खळबळ माजली आहे. यामागचे नेमके कारण काय आहे हे अजूनही समोर आलेले नाही. तरुण मुलाच्या नि’ध’ना’नं’त’र संपुर्ण चव्हाण कुटुंबावर शो’क’क’ळा पसरली आहे.