“लग्नानंतरही पतीला मित्रांसोबत पूर्वीप्रमाणे वेळ घालवता येईल”, अशा अनोख्या करारावर घेतल्या वधूच्या सह्या..

लग्न म्हंटले की अनेक गमतीशीर किस्से समोर येत असतात. आता आपल्याकडे सध्या लग्नाचा सिजन सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नाचे अनेक गमतीशीर किस्से समोर येतच असतात. अशातच केरळ मधून एक ‘लग्न करार’ पत्र सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र व्हायरल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी केरळ मधील एका जोडप्याचा विवाह पार पडला. यामध्ये वधूला एका मॅरेज कॉन्ट्रॅक्ट वर सही करायला सांगितली. हा लग्नाचा करार वराच्या मित्रांनी तयार केला होता.

या 50 रुपयांच्या स्टॅम्पवरील करारामध्ये वधूसाठी विचित्र अटी ठेवण्यात आल्या होत्या. या मध्ये वराच्या मित्रांनी एक करार करत वधूची त्यावर स्वाक्षरी घेतली आहे. या ‘मॅरेज कॉन्ट्रॅक्ट’वर मल्याळममध्ये वधू अर्चना.एस. या लग्नानंतरही आपला पती रघू.एस.केडीआरला पूर्वीप्रमाणे मित्रांसोबत रात्री 9 वाजेपर्यंत वेळ घालवू देतील.

त्याला मित्रांसोबत रात्री फिरण्याची मुभा देतील आणि यादरम्यान वारंवार आपल्या पतीला फोन कॉल करणार नाहीत, असे सगळे या करारात लिहीले आहे. या करारावर वधूसह दोन साक्षीदारांनीही सही केली आहे. हे ‘मॅरेज कॉन्ट्रॅक्ट’ सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page