प्रवासादरम्यान मृ’त्यू झालेल्या पत्नीचा दे’ह मांडीवर घेऊन नवऱ्याने 500 किमीचा प्रवास केला, कारण..
औंगाबाद येथे राहत असलेले नवीन यांचे काही दिवसांपूर्वी अरवाल जिल्ह्यामधील रहिवासी असलेल्या उर्मिला यांच्यासोबत लग्न झाले होते. नवीन हे एका कारखान्यात मजूर म्हणून काम करतात आणि त्यांची पत्नी उर्मिला मुलांचे क्लासेस घेत होत्या. अशा प्रकारे दोघेजण आपला उदरनिर्वाह करत होते.
उर्मिलाला हृ’दय’वि’का’रा’चा त्रास होता म्हणून नवीन आपल्या पत्निला घेवून लुधियानाला उपचारासाठी घेऊन गेला होता. शुक्रवारी रात्री लुधियानाहून परतताना ते बिहारच्या ट्रेनमधून प्रवास करत होते. त्यांनतर ट्रेन सुरू झाल्यानंतर थोड्या वेळातच उर्मिलाची प्रकृती बिघडली. आणि प्रवासादरम्यानच तिचा मृ’त्यू झाला, असे सांगण्यात आले.
त्यांनतर नवीनने याबाबत कोणालाच काही कळू दिले नाही. त्याच्यासोबत असणाऱ्या प्रवाशांना ह्याची भनक देखील त्याने लागू दिली नाही. त्याच्या पत्नीचा मृ’त्यु झाला आहे हे कळू नये म्हणून त्याने उर्मिलाचे तोंड ओढणीने झाकून ठेवले होते.
त्याने ही गोष्ट सर्वांपासून लपवली कारण त्याला भीती वाटत होती की, जर ही गोष्ट इतर लोकांना कळली की त्यांना कोणीही ट्रेनने प्रवास करु देणार नाहीत आणि जर त्याला ट्रेनमधून उतरवण्यात आले तर त्याला खाजगी गाडी करून पुढचा प्रवास करावा लागेल. खासगी गाडीला लागणार खर्च नवीन याला परवडणारा नव्हता.
शेवटी नाइलाजाने त्याने उर्मिलाचा मृ’त’देह आपल्या मांडीवर घेऊन जवळपास 500 किमीचा प्रवास पार केला. परंतु प्रवासाच्या शेवटी याबाबत काही प्रवाशांना उर्मिलाबद्दल संशय आला. त्यांनी विचारपूस केली असता तिचा मृ’त्यु झाला असल्याची माहिती त्यांना नवीनने दिली.
काही प्रवाशांनी याबाबत त’क्रा’र केली त्यांनतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही बातमी शाहजहांपूर जीआरपीला दिली. ट्रेन शाहजहानपूरला पोहोचली तेव्हा तिथे रेल्वे पोलीस आधीच प्लॅटफॉर्मवर दाखल झाले होते.
शहाजहानपूरला पोहोचल्यानंतर उर्मीलाचा मृ’त’दे’ह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आला आणि पुढे ऊर्मिलाचा मृ’त’दे’ह पो’स्ट’मा’र्ट’म’सा’ठी पाठवण्यात आला. आता पोलीसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्टस् आल्यानंतरच उर्मिला यांचा मृ’त’दे’ह नवीनच्या हातात दिला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.