गावच्या यात्रेत मौजमजा करण्याचे स्वप्न घेऊन जात असताना कार अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा मृ’त्यु

आजकाल दिवसेंदिवस रस्ता अ’प’घा’ताच्या घटना वाढत आहेत. अनेकवेळा सांगून देखील लोक नियमांचे पालन करत नाहीत. अशातच एक दु’र्दै’वी घटना सातारा जिल्ह्यातून समोर येत आहे. यामध्ये सख्ख्या दोन चुलत भावांचा अ’प’घा’तात दु’र्दै’वी मृ’त्यू झाला आहे.

उमाजी नरळे आणि अजित नरळे अशी या दोन भावांची नावे होती. हे दोघेही भाऊ त्यांच्या गावी यात्रेसाठी जात होते. मिळेल ते काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारा अजित हा त्यांच्या आई-वडिलांना एकुलता एक होता. तो सध्या पुण्यात नोकरी करत होता.

तर त्याचा चुलत भाऊ उमाजी हा नेपाळमध्ये एका सोन्या- चांदीच्या दुकानात काम करत होता. काही दिवसांत त्यांच्या गावची यात्रा होती, यासाठी दोघेही भाऊ दुचाकीवरून गावाला जात होते.

याचवेळी नामदेव वीरकर हे देखील त्यांच्या दुचाकीवरून म्हसवडच्या दिशेने जात होते. परंतु वाटेतच या दोन्ही दुचाकींची समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली. धडक एवढी जोरात होती की, अजित आणि नामदेव हे रस्त्या शेजारील खड्यात फेकले गेले.

या जोरात धडकेत कारचा पार भुगा झाला होता. तर दुचाकीने पेट घेतला होता. या अ’प’घा’तात उमाजीचा जागीच मृ’त्यू झाला होता. अजित आणि नामदेव यांना त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारासाठी नेत असताना अजितचाही मृ’त्यू झाला.

या दोन्ही भावांच्या मृ’त्यू’ची बातमी समजताच त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. या बातमीने गावात शो’क’क’ळा पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page