दूध आणण्यासाठी शेतकरी गेला तो घरी परतलाच नाही, अखेर तीन दिवसानंतर सापडला दे’ह..
सध्या राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांची या पावसामुळे नासाडी होत आहे. नदी नाले यांना पुर येत आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. अनेकांना पुराच्या पाण्यातून जी’व’घे’णा प्रवास करावा लागत आहे. अशातच नुकतेच एक प्रकरण सोलापूर मधून समोर आले आहे.
सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात बुधवार आणि गुरुवार असे दोन्ही दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने हरणा नदीला पूर आला आहे. अशातच 14 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी संध्याकाळी मुस्ती गावचे रहिवासी असणारे 50 वर्षीय शिवानंद शरणपा वाले यांची हरणा नदीच्या पलीकडे एक एकर जमीन आहे.
त्या दिवशी ते शेतातील जनावरे गोठ्यात बांधून दुध आणण्यासाठी गेले होते. घरी परतत असताना नदीतील पाण्याच्या वेग वाढतच चालला होता. यातूनच जी’व’घे’णा प्रवास करत असताना शिवानंद वाले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे सांगितले जात आहे.
बराच वेळ झाला तरी ते शेतातून घरी परतले नसल्यामुळे कुटुंबियांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवार पासून नदी पात्रात शोध घेतल्यानंतर अखेर रविवारी 16 ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांचा मृ’त’दे’ह सापडल्याची माहिती मिळाली आहे.
शिवानंद वाले यांच्या नि’ध’ना’मु’ळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाले कुटुंबावर शो’क’क’ळा पसरली आहे. तसेच संपूर्ण मस्ती गावात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. मुस्ती गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदीपलीकडे आहेत. दरवर्षी पावसाळ्यात हरणा नदीला पूर येतो.
अशातच शेतकऱ्यांना पाण्यातून जी’व’घे’णा प्रवास करावा लागत आहे. या आधीही या नदीला पूर आल्याने शेतकरी वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध’र’णे आंदोलन देखील केले होते. मात्र, अजूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे मुस्ती गावातील ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून जी’व’घे’णा प्रवास करावा लागत असल्याने तसेच शिवानंद वाले यांच्या सारखा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी लवकरात लवकर हरणा नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी या गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.