लोणचे विकून उभे केले करोडोंचे साम्राज्य, खूपच प्रेरणादायी आहे कृष्णा यादव यांची कहाणी..
जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी हार मानलेली नाही, हे वाक्य ‘श्री कृष्णा पिकल्स’चे संस्थापक कृष्णा यादव यांच्या जीवनावर चपलख बसते. कृष्णा यांनी आपल्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग पाहिले आहेत पण कधीही हार मानली नाही.
कृष्णा यादव शाळेतही गेल्या नाहीत आणि आज दिल्लीतील शाळांमध्ये मुलांना व्याख्यान देण्यासाठी त्यांना बोलावले जाते. कृष्णा यांना नाव लिहायला त्यांच्या मुलांनी शिकवले असेल पण आज त्यांचे नाव राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले आहे.
दिल्लीच्या नजफगड मध्ये राहणाऱ्या कृष्णा यादव, ज्यांच्या लोणचे, कँडीज, जॅम, ज्यूस इत्यादींना आज दिल्लीच्या आसपासच्या सर्व राज्यांत मागणी आहे. कधी कधी रस्त्याच्या कडेला टेबल ठेवून त्यावर काही डबे सजवून त्याच ते लोणचं विकायच्या. कोणाला लोणचे आवडले तर ते घेऊन जायचे, कधी अर्धा दिवस काहीही विकले जात नव्हते. पण कृष्णा यांनी हार मानली नाही कारण त्यांनी वाईट दिवस पाहिले होते.
कृष्णा म्हणाल्या की, त्यांचा नवरा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता, पण त्यात तोटा इतका झाला की ते क’र्ज’बा’जा’री झाले. त्यावेळी त्यांना मुलबाळही झाले नव्हते आणि हे सर्व पाहून पतीची मानसिक स्थितीही ठीक नव्हती, यानंतर त्यांनी ठरवले की काहीही झाले तरी आपण हार मानणार नाही. आता घराबाहेर पडून काहीतरी करायला हवे.
नंतर कृष्णा आपल्या कुटुंबासह दिल्लीला आल्या. ओळखीच्या व्यक्तीकडून 500 रुपये उसने घेऊन दिल्लीत येऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. काम न मिळाल्याने कृष्णा यांनी शेती करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्या टीव्हीवर ‘कृषीदर्शन’ कार्यक्रम बघायच्या. या कार्यक्रमात त्यांना लोणच्या बनवण्याच्या प्रशिक्षणाची माहिती मिळाली आणि त्यांनी प्रशिक्षणासोबतच भाजीपाला पिकवून लोणचे बनवून विकण्याचा निर्णय घेतला.
एका माहितीदाराच्या मदतीने त्यांनी उजरा येथील राष्ट्रीय कृषी संस्थेतून तीन महिने प्रशिक्षण घेतले. या काळात त्या थोडं लिहायला आणि वाचायलाही शिकल्या. प्रशिक्षणानंतर त्यांनी तीन हजार रुपये खर्चून करवंद आणि मिरचीचे लोणचे बनवले. आता लोणचे तर बनवले पण विकायचे कसे? त्यांना बाजारपेठेतील दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वत: लोणच्याचे मार्केटिंग सुरू केले. नंतर त्यांनी नजफगढजवळ एक स्टॉल लावला आणि लोणची विकायला सुरुवात केली. दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढत गेला.
आज कृष्णा यांचे 5 कारखाने आहेत आणि सुमारे 152 उत्पादने त्या तयार करतात. ज्यामध्ये फळे आणि भाज्यांचे लोणचे, जाम, कँडीज आणि विविध रस यांचा समावेश आहे. कृष्णा म्हणाल्या, आजही त्यांचे जुने ग्राहक त्यांच्याकडून लोणचे घेतात. जेव्हा लोक त्यांचे लोणचे खातात तेव्हा ते म्हणतात की हे लोणचे त्यांच्या आजीने बनवलेल्या लोणच्यासारखेच असते.
कृष्णा म्हणाल्या, “पूर्वी मी एकटाच काम करायचो आणि आता 70 हून अधिक महिला माझ्यासोबत लोणचे बनवतात. यासोबतच कंपनीच्या विविध कामांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. वर्षभरात 5 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. कृष्णा यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2015 मध्ये त्यांना नारीशक्ती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.