ट्रॅक्टरपासून बाईकपर्यंत, या IAS अधिकाऱ्याची पत्नी JCB देखील चालवते, अशा रीतीने केला गावाचा विकास..
देशाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी काम करणारे अनेक अधिकारी आपण पाहिले आहेत पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्यांनी एका गावाची पूर्ण प्रतिमाच बदलून टाकली.
गावात गेल्यावर वाटेत त्यांची गाडी अडकली, अनेक प्रयत्न करूनही गाडी बाहेर येत नव्हती. शेवटी बैलगाडीच्या साहाय्याने ते लोक गावाकडे निघतात, पण तेही चिखलात अडकतात. यातूनच या महिलेला गावाचा विकास करण्याची प्रेरणा मिळाली.
आम्ही बोलत आहोत, आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित सिंहवाहिनी पंचायतीच्या मुखिया रितू जैस्वाल यांच्याबद्दल. रितू जैस्वाल या दिल्लीचे आयएएस अधिकारी अरुण जयस्वाल यांच्या पत्नी आहेत. त्यांनी गावात राहावे असे त्यांच्या नवऱ्याला कधीच वाटत नव्हते.
पण गावातील लोकांच्या समस्या आणि गावातील व्यवस्था पाहून त्यांच्या पत्नीला गावाप्रती असलेली जबाबदारी समजली. त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागले, छोट्या छोट्या कामापासून सुरुवात करून गावाच्या विकासासाठी त्यांनी सतत काम केले आणि या सर्व कामात त्यांना कुटुंबासाठी वेळही देता आला नाही.
रितू जैस्वाल यांनी सांगितले की, 1996 मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती अरुण कुमार हे 1995 च्या बॅचचे आयएएस होते. लग्नानंतर 15 वर्षे त्या त्यांच्या पतीसोबत जिथे पोस्टिंग होती तिथे राहत होत्या. मग त्या एकदा त्यांच्या गावाला गेल्या आणि मग त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
आपल्या कुटुंबात दोन मुले सोडून गाव सुधारण्यासाठी जाणे रितू यांच्यासाठी सोपे नव्हते, पण गावातील अनेक कुटुंबे विकासापासून वंचित होती, गावाची अवस्थाही बिकट होती त्यामुळे रितू यांनी हा निर्णय घेतला आणि त्या गावी पोहोचल्या.
रितू म्हणाल्या, “माझ्या पतीने आणि माझ्या मुलीने माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि माझ्या मुलीने सांगितले की आई आपण वसतिगृहात राहू पण गावी जाऊन तिथे अनेक मुलांना शिकवू, तिच्या बोलण्याने मला धीर दिला, तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला आणि ती निघून गेली, स्वतःच्या गावाच्या विकासासाठी.”
2016 मध्ये रितू यांनी बिहारमधील सिंहवाहिनी पंचायतीमधून मुखिया पदासाठी निवडणूक लढवली पण विजय इतका सोपा नव्हता, त्यांच्या पुढे 32 उमेदवार उभे होते. त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली. लोकांना रितू यांचा मुद्दा समजला आणि त्यामुळे त्यांना भरघोस मतदान करून गावकऱ्यांनी विजयी केले.
आता गावाच्या विकासाची जबाबदारी रितू यांच्या खांद्यावर होती आणि त्यांनी ती जबाबदारी पार पाडली. गावात चांगले रस्ते नव्हते, वीज नव्हती, मोबाईल टॉवर नव्हते. रितू यांच्यासाठी हे अवघड पाऊल असले तरी हळूहळू त्यांनी गावातल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
गावातील लोक रस्ता बनवण्यासाठी आपली एक इंचही जमीन सोडायला तयार नव्हते, ही रितू यांच्यासाठी मोठी अडचण होती. पण रितू यांनी गावातील लोकांना समजवले आणि गावात रस्तेही बांधले. आज रितू गावाच्या विकासकामांसाठी दुचाकी, ट्रॅक्टर आणि जेसीबीही चालवतात.