आईचे नि’ध’न झाल्यानंतर वडिलांनी घरातून बाहेर काढले, आजी-आजोबांनी दिला आधार, 99.4 गुण मिळवून दहावीत राज्यात अव्वल..

आपल्या मुलांनी भविष्यात चांगले यश प्राप्त करावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु आज आपण जी कहाणी पाहणार आहोत ती थोडी वेगळी आहे. पाटणा शहरात राहणारी श्रीजा ही अवघ्या 4 वर्षांची असताना तिच्या आईचे नि’ध’न झाले होते. आईच्या नि’ध’ना’नंतर वडीलांनी श्रीजाला घराबाहेर काढले.

अशा परिस्थितीमध्ये तिच्या आजी-आजोबांनी तिला आधार दिला. तिचे पालनपोषण केले. त्यांनी तिच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतली. श्रीजा पाटण्यात शाळेला होती. यावर्षी तिने दहावीच्या परीक्षेत 99.4 टक्के गुण मिळवून संपूर्ण राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले गेले.

श्रीजाने आपल्या आजी-आजोबांसोबत राहून दहावीच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावून मुलींना स्वतःवर ओझे मानणाऱ्या तिच्या वडिलांसह लाखो लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. श्रीजा तिच्या या यशाचे श्रेय तिच्या आजी आजोबा आणि तिच्या दोन्ही मामांना देते.

तिच्यावर आपल्या मुलीसारखे प्रेम करतात. तिच्या सर्व गरजा ते पूर्ण करतात. तसेच तिच्या शिक्षकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली असे, ती म्हणते. श्रीजाने कोणतेही कोचिंग न घेता तिच्या मेहनतीच्या जोरावर घरीच अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. यामुळे ती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page