घरात दोन वेळचे जेवण सुद्धा नीट मिळायचे नाही, आज त्याच कुटुंबातील मुलगी झाली ‘पोलीस अधिकारी’
कित्येक लोक प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठत असतात. संसाधनांची कमतरता असूनही अनेक लोक आपले स्वप्न पूर्ण करतात. आज आपण अशाच एका महिलेची गोष्ट जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तेजल आहेर या लहान असल्यापासून त्यांना पोलिस अधिकारी बनवण्याचे त्यांच्या आईचे स्वप्न होते. यामुळे तेजल यांनी देखील पोलिस अधिकारी बनण्याचा निर्धार केला होता. परंतु त्यांची घरची परिस्थिती फार बेताची होती. यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण सुद्धा नीट मिळायचे नाही.
अशा परिस्थितीमध्ये असताना देखील तेजल यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षा देण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले.
तेजल यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग लावणे त्यांना परवडणारे नव्हते. अशा परिस्थितीतही त्यांनी स्वत:च्या हिमतीवर अभ्यास केला. अखेर त्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची परीक्षा उत्तीर्ण होऊन आज अधिकारी बनल्या आहेत.
त्यांनी त्यांच्या आईचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. याचा त्यांना खूप अभिमान आहे. प्रशिक्षण पूर्ण करून तेजल जेव्हा घरी गेल्या तेव्हा त्यांना पोलिस वर्दीमध्ये पाहून त्यांचे संपूर्ण कुटुंब भावूक झाले होते. त्यांच्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली होती.
आज तेजल या सर्व गरीब विद्यार्थ्यांना सल्ला देत असतात की, कितीही वाईट परिस्थिती असली तरी घाबरून न जाता त्या परिस्थितीला सामोरे जायचे आणि आपले ध्येय गाठायचे. त्यांचा हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.