घरात झोपलेल्या अवस्थेत असताना दोन सख्ख्या भावंडाना झाला स’र्प’दं’श, चिमुकल्यांच्या जाण्याने गावावर पसरली शो’ककळा
कधी कोणावर कोणती वेळ चालून येईल याचा अंदाज बांधता येत नाही. तसेच काळावर देखील कोणाचे नियंत्रण नसते. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामधील देव्हाडा येथून एक दु’र्दै’वी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे देव्हाडा परिसरात शो’क’क’ळा पसरली आहे.
सुशील बालवीर डोंगरे वय वर्ष 8 आणि उत्कर्ष बालवीर डोंगरे वय वर्ष 11 ही दोन भावंडे घरात झोपलेली असताना त्यांच्या घराच्या मागच्या दरवाजातून सा’प आत आला. दोघांच्या बिछान्यावर येऊन झोपलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या या दोघा भावंडांना त्याने स’र्प’दं’श केला.
काहीतरी टोचल्यासारखे त्या दोघांनाही जाणवले आणि ते झोपेतून जागे झाले. त्यांनतर त्यांना स’र्प’दं’श झाला आहे असे त्यांच्या घरतील लोकांना समजताच त्यांनी लगेच त्या दोघांना तमसूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढे त्यांना उपचारांसाठी भंडारा जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांच्यावर उपचार चालू असतानाच या दोघा भावंडांपैकी एकाचा म्हणजेच उत्कर्ष डोंगरे ह्याचा दुर्दैवी मृ’त्यू झाला.
पुढे सुशील डोंगरे याला भंडारा जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयातून नागपूर येथील शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी घेऊन गेले. मात्र, त्याचा ही तिकडे उपचारादरम्यान मृ’त्यु झाला. या दोघा भावंडांच्या दु’र्दै’वी मृ’त्यू’मु’ळे त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच देव्हाडा परिसरात या दु’र्दै’वी घटनेमुळे शो’क’क’ळा पसरली आहे.