एकतर्फी प्रेमातून तरुणाने घातला गोंधळ, म्हणाला “तू मला लग्नाला हो म्हण नाहीतर..
प्रेमात पडलेली व्यक्ती आंधळी असते असे म्हणतात. त्यात एकतर्फी प्रेम म्हणजे काही ओरच. आपण एकतर्फी प्रेमाचे अनेक किस्से पाहिले असतील. नुकतीच वर्ध्यातून एकतर्फी प्रेमाची एक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यामधील पार्डी गावातील रहिवासी असलेला तुषार याची त्याच्यासोबत महाविद्यालयात शिकत असणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यांनतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. परंतु, तूषार त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला होता आणि त्याने एके दिवशी आपले प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर तुषारने एके दिवशी एकतर्फी प्रेमातून त्या तरुणीला प्रेमाची कबुली दिली. मात्र, त्या तरुणीने त्याला नकार देत आपण फक्त मित्र राहू, असे सांगितले. त्यांनतर तुषार त्या तरुणीच्या घरी गेला. तेव्हा तरुणी तिच्या भावासोबत घरी होती.
त्यावेळेस तुषार घरी गेला आणि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तू मला हो म्हण, असे म्हणू लागला. यादरम्यान त्या तरुणीने त्याला नकार देत नीट समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला.
परंतु, तरूणीने नकार दिल्यामुळे तुषार संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीच्या का’न’शि’लात लगावून दिली. त्याने तिचा मोबाइल घेत जोरात जमिनीवर आदळला. तसेच तिला खूप शि’वी’गा’ळ देखील केली. तरुणीने हो म्हणण्यासाठी तुषारने ज’ब’रद’स्ती देखील केली.
त्यादरम्यान त्या तरूणीने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुषारने तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझ्या घरच्यांना मी जिवे मा’रू’न टाकेन तसेच स्वत:च्या जिवाचे ही बरेवाईट करून तुम्हा सर्वांना यामध्ये फ’स’वे’न, तू जर माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, अशी ध’म’की देत तुषार तेथून पळून गेला.
या सर्व प्रकारची माहिती तरुणीने तिच्या वडिलांना दिली. त्यांनतर संतापलेल्या वडिलांनी थेट तरुणीला घेऊन तळेगाव पोलिस ठाणे गाठले. त्यांनी तुषार विरोधात मा’र’हा’ण आणि वि’न’य’भं’गा’ची त’क्रा’र दाखल केली आहे. याबाबत तळेगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.