तीन मुलींनंतर झाला मुलगा, पत्नीचा रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने नवऱ्याने केले असे काही की..
दररोज सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमातून नवनवीन गोष्टी तसेच काही वाईट किंवा धक्का देणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. नुकतीच एक चकित करणारी घटना लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील वाका गावात राहणाऱ्या 28 वर्षीय वि. माने यांना तीन मुली आहेत आणि आता त्यांना नुकतेच चौथे अपत्य हा मुलगा झाला आहे. त्यां
च्या पत्नीचे सि’झे’री’य’न झाल्यामुळे रुग्णालयातील खर्च माने यांना परवडणारा नव्हता. यामुळेच त्यांनी आपले आयुष्य सं’प’व’ण्या’चा निर्णय घेतला. लातूर मधील पाण्याच्या टाकीजवळ वैशाली इडली गृह येथे असलेल्या विद्युत तारेला ल’ट’कू’न ते आपली जीवनयात्रा सं’प’व’ण्या’चा प्रयत्न करत होते. याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना समजताच त्यांनी त्वरित विज विभागाशी संपर्क साधून लगेच विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितला.
यानंतर वि. माने यांना खाली येण्यास तेथील नागरिकांनी सांगितले. तारेला ल’ट’क’ले’ल्या वि. माने यांनी थेट खाली उडी मारली. यामुळे त्यांच्या कमरेला जबर मार लागला. यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचे सि’टी’स्कॅ’न करण्यात आले.
काही वेळानंतर विकास हे ल’घु’शं’के’चा बहाणा करून शौचालयात गेले. त्यांनी तेथे पुन्हा आयुष्य सं’प’व’ण्या’चा प्रयत्न केला. त्यांनी तेथील खिडकीच्या काचा काढून स्वतःला ज’ख’म करून घेतली. मात्र, वेळवर ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले आणि पुन्हा त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या संपुर्ण प्रकरणाचा पोलिस तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.