प्रेमात आंधळ्या झालेल्या या तरुणीने केला मोठा घोटाळा! वडिलांनी श’स्त्र’क्रि’येसाठी जमा केलेले पैसे घेऊन प्रियकरासह झाली फ’रा’र..
प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते ह्यात काही शंका नाही कारण अनेक प्रेमी प्रेमात एवढे आंधळे झालेले असतात की त्यांना कशाचेच भान राहत नाही. यामुळे अनेकदा या साऱ्या गोष्टींचा त्यांच्या कुटुंबाला देखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. आज आपण अशीच एक घटना जाणून घेणार आहोत जी पाहून तुम्हालाही वाईट वाटेल.
हे प्रकरण राजस्थान येथील पाली मधून समोर आले आहे. या ठिकाणी राहत असलेल्या बाप-लेक यांच्यातील वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. यात तरुणीला तिच्या प्रियकराशी लग्न करायचे होते. परंतु, कुटूंबाचा या गोष्टीला विरोध होता त्यामुळे त्यांनी त्या तरुणीचे दुसऱ्या एका तरुणाशी लग्न करण्याचे ठरवले.
यात विशेष बाब म्हणजे, ती तरुणी रुग्णालयात जाण्याचा बहाणा सांगून तिच्या प्रियकरासह पळून गेली. यात विशेष म्हणजे ही तरुणी तिच्या वडीलांच्या उपचारांसाठी साठवलेले पैसे घेऊन घरातून फ’रा’र झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी घरातून पळून जाऊन तिच्या प्रियकरासोबत एका खाजगी बसने शिवगंजला पोहचली. तेथून त्यांनी एक कार भाड्याने घेऊन अहमदाबादला गेले आणि नंतर ते दोघेही रेल्वेने मुंबईला आले. तिथे त्या दोघांनीही कोर्टात लग्न केले. लग्न करून ते दोघेही तख्तगड पोलीस ठाण्यात गेले.
याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळताच ते देखील तख्तगड पोलीस ठाण्यात दाखल झाले. तरुणी तख्तगड पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिने सांगितले की, तिने तिच्या प्रियकरासोबत कोर्टात लग्न केले आहे आणि आता ती तिच्या प्रियकरासोबतच राहील. या सर्व प्रकारानंतर पोलिस ठाण्यात मुलीमध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये खूप बाचाबाची झाली.
ही तरुणी वडिलांच्या ऑ’प’रे’श’नसाठी बाजूला ठेवलेले पैसे घेऊन फ’रा’र झाल्याचा आ’रो’प तिच्या घरच्यांनी केला. यावर तरूणी म्हणाली, तिने घरातून केवळ 500 रुपये आणि तिच्या वडिलांच्या आजाराचे पत्र वगळता काहीही आणलेले नाही.
यानंतर पोलिसांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीला तिच्या प्रियकरासह घरी पाठवले. त्यांनतर पोलिसांनी घरातून हरवलेले 3 लाख 15 हजारांचा शोध घेण्यास सुरुवात केली.